सफाई कामगारांना मनपामध्ये कायम सेवेत सामावून घेण्याची आरपीआयची मागणी…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क;

मागील २० ते २५ वर्षांपासून शहरात स्वच्छता विभागाचे काम कंत्राटी पद्धतीने करणाऱ्या साफ सफाई कामगारांना महापालिकेने कायमस्वरूपी कामगार म्हणून सेवेत रुजू करण्यासाठी आज आरपीआय (आठवले गट) ने लोकशाही पद्धतीने मागणी करत आपल्याच कार्यालयाबाहेर एकदिवसीय निदर्शने केले.

तसेच त्यांनी कोरोन काळात दिलेल्या सेवेचा विचार करता विमा सुरक्षा कवच सुद्धा देण्यात यावे, त्याच बरोबर निवृत्तीवेतन, महागाई भत्ता व शासनाच्या विविध योजनांचा त्यांना फायदा मिळावा अशी मागणी देखील करण्यात आली. सर्व सफाई कामगार हे गरिबीच्या परिस्थितीतील असून त्यांचे पगार हे वेळेवर होत नाहीत ते वेळेवर व्हावे हि सुद्धा मागणी प्रामुख्याने करण्यात आली. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटातर्फे महानगराध्यक्ष अनिल अडकमोल यांच्या नेतृत्वाखाली लोकशाही मार्गाने हे एकदिवसीय निदर्शने करण्यात आले. यावेळी वरील सर्व विषयाच्या अनुषंगाने मनपाने आमच्या मागणीचा शासनाकडे पाठपुरावा करून कामगारांना योग्य तो न्याय द्यावा ही अपेक्षा करतो. असे ते म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.