नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क:
ज्येष्ठ भारतीय उद्योगपती आणि टाटा सन्सचे अध्यक्ष रतन टाटा यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. अहवालानुसार, त्यांची पीएम केअर्स फंडचे नवीन विश्वस्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. रतन टाटा यांच्यासह सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती केटी थॉमस आणि लोकसभेचे माजी उपसभापती कारिया मुंडा यांना पीएम केअर्स फंडचे विश्वस्त बनवण्यात आले आहे.
अहवालानुसार, याशिवाय देशातील इतर काही बड्या व्यक्तींनाही सल्लागार गटात नामांकन देण्यात आले आहे. माजी कॅग राजीव महर्षी, इन्फोसिस फाऊंडेशनच्या माजी अध्यक्षा सुधा मूर्ती, इंडिकॉर्प्स आणि पिरामल फाऊंडेशनचे माजी सीईओ आनंद शाह यांना सल्लागार मंडळासाठी नामांकन देण्यात आले आहे, असे त्यात म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी विश्वस्त मंडळाची बैठक झाली. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन उपस्थित होते. यासोबतच नवनिर्वाचित सदस्यही या बैठकीत सहभागी झाले होते. पंतप्रधान मोदी यांनी नवीन विश्वस्तांचे स्वागत केले. कोरोना महामारीच्या काळात आपत्कालीन मदत म्हणून 2020 मध्ये पीएम केअर फंडाची निर्मिती करण्यात आली. या निधीचे अध्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत.
रतन टाटा यांचे व्यक्तिमत्त्व पाहिल्यास ते केवळ व्यापारीच नाहीत, तर ते एक सरळ साधे, उदार व्यक्ती, आदर्श आणि लोकांसाठी प्रेरणादायी आहेत. टाटा समूहाशी संबंधित असलेल्या अगदी लहान कर्मचाऱ्यालाही ते आपले कुटुंब मानतात आणि त्यांची काळजी घेण्यात कोणतीही कसर सोडत नाहीत. याशिवाय ते कमाईचा मोठा हिस्सा दान करण्यासाठीही ओळखले जातात.
पंतप्रधान नागरिक सहाय्य आणि आपत्कालीन परिस्थिती मदत निधी (पीएम केअर्स फंड) ची ट्रस्ट नोंदणी 27 मार्च 2020 रोजी नवी दिल्ली येथे नोंदणी कायदा 1908 अंतर्गत करण्यात आली होती, या निधीला दिलेल्या देणग्या पूर्णपणे करमुक्त आहेत. पंतप्रधान कार्यालयाच्या (पीएमओ) नुसार, पीएम मोदी म्हणाले की, नवीन विश्वस्त आणि सल्लागारांच्या सहभागाने या निधीच्या कामकाजाला सर्वसमावेशक दृश्य मिळेल. सार्वजनिक जीवनातील त्यांचा विपुल अनुभव हा निधी विविध सार्वजनिक गरजांना अधिक प्रतिसाद देण्यास अधिक चालना देईल असे ते म्हणाले.
हे नमूद करण्यासारखे आहे की, ऑडिटने नुकत्याच जारी केलेल्या निवेदनात माहिती देताना असे सांगण्यात आले की, 2020-21 या आर्थिक वर्षात कोविडसारख्या आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी पंतप्रधान नागरिक सहाय्यता आणि मदत निधी (पीएम केअर्स फंड) तयार करण्यात आला. सुमारे तीन पटीने वाढून 10,990 कोटी रुपये झाले तर या निधीतून खर्च केलेली रक्कम 3,976 कोटी रुपये झाली. यामध्ये स्थलांतरित कल्याणासाठी 1,000 कोटी रुपयांहून अधिक आणि कोविड लसींच्या खरेदीसाठी 1,392 कोटी रुपयांहून अधिक रकमेचा समावेश आहे.