पुणे, लोकशाही, न्यूज नेटवर्क
पर्यटनासाठी गेलेल्या युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली असून मावळातील (Maval) निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी कोल्हापुरातील काही पर्यटक चार दिवसांपूर्वी मावळात आले होते. हे तरुण 5 तारखेला आंदर मावळातील टाटा धरणार फिरण्यासाठी गेले. त्यामधील अर्जुन माने आणि अक्षय कुंभार हे पाण्यात उतरले तर त्यांचे अन्य पाच मित्र किनाऱ्यावर उभे होते. पोहायला उतरलेल्या दोघांपैकी अर्जुन माने हा धरणाच्या खोलीचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडाला तर त्याचा मित्र पटकन बाहेर आला. मित्र बुडाल्याचे लक्षात येताच तरुणांनी तात्काळ पोलिसांना याबाबतची माहिती दिली.
अर्जुन माने (Arjun Mane) असे या युवकाचे नाव असून घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह रेस्क्यू टीम मृतदेहाचा शोध घेत आहे. मात्र ९० तास उलटून गेले तरीही मृतदेह अद्याप हाती लागला नसल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच वडगांव पोलीस आणि वन्यजीव रक्षक मावळची टीम अर्जुन मानेचा शोध घेवू लागली आहे. या शोधकार्यात, खोपोलीतील आपघातग्रस्तांच्या मदतीची रेस्कु टीम तसेच लोणावळा येथील शिवदुर्ग रेस्कु, टीमची मदत मोलाची होत आहे.