दोन अल्पवयीन मुलांना कुसुंबा गावातून पळविले

0

जळगाव : तालुक्यातील कुसुंबा गावातील इंदिरानगर भागात राहणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांना अज्ञात व्यक्तीने पळवून नेले. ही घटना सोमवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी मंगळवारी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुक्यातील कुसुंबा गावातील इंदिरानगरमध्ये मानव संतोष पाटील (वय ११) व वैभव रवींद्र ठाकूर (वय १३) हे दोघे वास्तव्यास आहे. दि. १५ जानेवारी रोजी दोघांनी आम्ही बाहेर जाऊन येतो असे सांगून ते दुपारी १२ वाजेच्या सुमारास घराबाहेर पडले. रात्री उशिरापर्यंत ते घरी न आल्याने नातेवाईकांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला. मात्र दोघांबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर त्यांच्या कुटुंबियांनी एमआयडीसी पोलिसात धाव घेत तक्रार दिली. या तक्रारीवरुन अज्ञात व्यक्तीविरुद्ध गन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.