उद्धव ठाकरेंकडे आता फक्त आदित्य,राऊत आणि अंधारेच राहतील -आ. नितेश राणे

0

मुंबई ;- एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ठाकरे गटातून गळती सुरुच झाली. त्यानंतर आता ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे या आता शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. आज दुपारी निलम गोऱ्हे यांच्यासोबत दोन मोठे पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील शिवसेनेत सहभागी होणार आहेत.

अशात भाजप नेत्ते नितेश राणे यांनी ठाकरे गटाच्या गळती वरून उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. नितेश राणे म्हणाले,’शिवसेना आणि राष्ट्रवादीने राऊत आणि सुषमा अंधारेंचं नागरी सत्कार करायला हवा. कारण, त्यांच्यामुळे आमचे काम सोप्प झालं आहे. ते जेवढं बोलतील आणि पत्रकार परिषदा घेतील तेवढी माणसं आमच्याकडे येणार आहेत. शिवसेनेतील ६ आमदार एकनाथ शिंदे यांच्याकडे येण्यास तयार आहेत. उद्धव ठाकरे यांच्याकडे फक्त आदित्य ठाकरे, राऊत, अंधारेच राहतील,” अशी टीका भाजपा आमदार नितेश राणे यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.