नवी दिल्ली ;- श्री अमरनाथ यात्रा जम्मू-काश्मीरमधील खराब हवामानामुळे शुक्रवारी पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आली आहे. बेस कॅम्प बालटाल आणि पहलगाम या दोन्ही मार्गांवर प्रवाशांना जाण्यापासून रोखण्यात आले आहे.
तर बम-बम भोलेच्या जयघोषाने लखनपूर ते काश्मीरपर्यंतचे वातावरण शिवमय झाले असून अमरनाथ यात्रेसाठी देशभरातून आणि जगभरातून हजारो भाविक दररोज जम्मू-काश्मीरला पोहोचत आहेत. दरम्यान, गुरुवारी 17,202 यात्रेकरूंनी बाबा बर्फानींचे दर्शन घेतले. त्याचबरोबर यात्रा सुरू झाल्यापासून एकूण ८४,७६८ भाविकांनी दरबारात हजेरी लावली आहे.
“सकाळी ही यात्रा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे,” असे एका अधिकाऱ्याने सांगितले. कोणत्याही यात्रेकरूला पवित्र गुहेकडे जाण्याची परवानगी नाही. 3,200 हून अधिक यात्रेकरूंना नुनवान, पहलगाम बेस कॅम्प आणि 4,000 बालटाल बेस कॅम्पवर ठेवण्यात आले आहे. हवामान सुधारल्यानंतर यात्रा पुन्हा सुरू होईल.