नाशिक : शहरात आत्महत्येची मालिका सुरूच असून, मंगळवारी (दि. ६) वेगवेगळ्या भागात राहणाऱ्या तिघांनी गळफास लावून घेत आत्महत्या केली. त्यात एका महिलेचा व दोन तरुणांचा समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चुंचाळे शिवारात राहणाऱ्या देवशाली सतीष चक्रनारायण (वय २९, रा. शांतीदर्शन अपा., दत्तनगर) या विवाहितेने मंगळवारी सायंकाळच्या सुमारास अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील बेडरूममध्ये पंख्यास ओढणी बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच पती सतीश चक्रनारायण यांनी त्यांना तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, वैद्यकीय सूत्रांनी तपासून मृत घोषित केले. दुसरी घटना सिडकोत घडली. विकी सुरेश नागरे (वय २८, रा. शिवराज सोसा., माणिकनगर) या तरुणाने मंगळवारी अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात गळफास लावून घेतला होता. त्यात त्याचा मृत्यू झाला. याबाबत शेजारी नामदेव डोईफोडे यांनी खबर दिली आहे.
दोन्ही घटनांप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या मृत्यूच्या नोंदी करण्यात आल्या असून, हवालदार झोले व राऊत तपास करीत आहेत. तिसरी घटना उंटवाडीतील बाल न्याय मंडळ परिसरात घडली. श्याम विठ्ठल मिरके (वय २५, रा. इरिगेशन ऑफिसजवळ, क्रांतीनगर, उंटवाडी) या युवकाने मंगळवारी दुपारच्या सुमारास अज्ञात कारणातून बाल न्याय मंडळ आवाराच्या पाठीमागील मोकळ्या मैदानावर पिंपळाच्या झाडास दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच भाऊ कैलास मिरके याने त्यास जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, वैद्यकीय सुत्रांनी तपासून मृत घोषित केले. याबाबत हवालदार योगेश अहिवळे यांनी दिलेल्या खबरीवरून मुंबई नाका पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, हवालदार शिंदे तपास करीत आहेत.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.