मुंबई;- बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबामुळे अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यताभारतीय हवामान खात्यानेआज वर्तवली असून मुंबईसह, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. पुढील काही तासांत याठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. पालघर आणि ठाणे जिल्ह्यालाही हवामान खात्याने ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. रायगड जिल्ह्याला उद्याही रेड अलर्ट देण्यात आला आहे.
खरं तर, सध्या बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढली आहे. हे कमी दाबाचे क्षेत्र वायव्य दिशेला सरकत आहे. परिणामी पुढील दोन दिवस राज्यात बहुतेक ठिकाणी मुसळधारेचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. हवामान विभागाने रत्नागिरी, गडचिरोली, चंद्रपूरसह पुणे, सातारा जिल्ह्यातील घाट परिसराला रेड अलर्ट दिला आहे.