रिक्षा भरण्याच्या कारणावरुन सात जणांनी रिक्षाचालकाला केली बेदम मारहाण

0

जळगाव ;- शहरातील रेल्वेस्थानक परिसरात रिक्षा भरण्याच्या कारणावरुन सात जणांनी रिक्षाचालकाला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी बुधवारी जळगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरातील मढी चौक येथे नीलेश चंद्रकांत ठाकूर हे वास्तव्यास आहेत ते रिक्षाचालक असून रेल्वेस्थानकावर रिक्षा लावून प्रवासी वाहतूक करतात. मंगळवारी रात्री १० वाजेच्या सुमारास नीलेश ठाकूर हे नेहमीप्रमाणे त्यांच्या रिक्षात प्रवासी भरत असताना, यावरून त्यांच्याशी तौसिफ शेख शकील अहमद (४५) व ओसामा शेख अब्दुल सत्तार (४२) या दोघांनी वाद घातला. याच कारणावरून तौसिफ, ओसामा या दोघांसह आणखी पाच जणांनी नीलेश ठाकूर यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी तोंडावर तसेच पोटावर मारहाण केली. या मारहाणीत नीलेश ठाकूर हे जखमी झाले आहेत. याप्रकरणी नीलेश ठाकूर यांनी दुसऱ्या दिवशी बुधवारी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरून तौसिफ शेख शकील अहमद व ओसामा शेख अब्दुल सत्तार (दोन्ही रा. शाहूनगर) यांच्यासह इतर पाच अनोळखी व्यक्ती अशा सात जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास सहायक फौजदार संजय बडगुजर हे करीत आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.