मनोज जरांगे पाटलांचा फडवणीसाना इशारा
मुंबई ;- देवेंद्र फडणवीसांना विनंती आहे आम्हाला शांत राहू द्या. तुमच्या डोक्यातला विषारी विचार मराठा नेत्यांच्या डोक्यात ओतू नका. त्यांच्या माध्यमातून मराठ्यांमध्ये कलह घडवू नका,” असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
छगन भुजबळांना जातीय वादाचे स्वप्न पडते. पण मराठ्यांनी पक्के मनावर घेतले आहे. त्यांनी कितीही जातीवाद केला तरी मराठा आणि ओबीसी बांधव गावखेड्यात एकमेकांचे चांगले मित्र आहेत. कारण सगळा समाज मराठा समाजासोबत आहेत. बंजारा समाजाच्या आरक्षणाला मराठा समाजाने पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे आंदोलनातही आम्ही सोबत आहेत. छगन भुजबळ त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी दहा पाच लोक जमवतात. पण त्यांच्यासोबत बसणाऱ्या ओबीसी नेत्यांनी थोडे आत्मपरीक्षण केले, तर इतिहास भुजबळांनी जातीयवाद केला आहे. प्रचंड विश्वासघाती माणूस आहेत. त्यांना सांगणे आमचे काम आहे,” असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले.