काँग्रेसची सत्ता आल्यावर राम मंदिराचे शुद्धीकरण करू – नाना पटोले

0

धुळे – लोकशाही न्युज नेटवर्क –
राम मंदिर उभारणीत नरेंद्र मोदी यांनी अधर्माच्या आधारावर काम केलं आहे. आम्ही ते सुधारून धर्माच्या आधारावर काम करू, तसेच अयोध्येत राम दरबार उभारु, असे म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नरेंद्र मोदींवर तोफ डागली.
धुळे लोकसभेच्या महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. शोभा बच्छाव यांच्या प्रचारासाठी नाना पटोले धुळे दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी प्रसार माध्यामांशी संवाद साधला. दरम्यान, नरेंद्र मोदी यांनी केलेल्या योजना आणि राम मंदिर काँग्रेस काढून घेणार असल्याच्या आरोपावर पटोलेंनी प्रत्युत्तर दिले आहे. पटोले म्हणाले, भाजपची स्वत:ची कोणतीही योजना नाही, मोफत अन्नधान्य देणार ही आमचीच योजना आहे. उलट आम्ही या योजनेत गोरगरिबांना खायचं तेल, साखर, डाळ देऊन योजना वाढवणार. तसेच बेरोजगार तरुणांच्या हाताला देखील काम देऊ.
राम मंदिराबाबत केलेल्या आरोपावर नाना पटोले पलटवार करत म्हणाले की, काँग्रेसची सत्ता आल्यावर राम मंदिराचे आम्ही शुद्धीकरण करणार आहोत. हिंदू धर्मातील श्रेष्ठ असलेल्या या चारही शंकराचार्यांच्या हातून राम मंदिराचे शुद्धीकरण केले जाईल आणि अयोध्येत राम दरबार स्थापन केला जाईल. राम मंदिर उभारण्यात नरेंद्र मोदी यांनी अधर्माच्या आधारावर काम केलं आहे. आम्ही हे सुधारून धर्माच्या आधारावर काम करू.असे ते म्हणाले

Leave A Reply

Your email address will not be published.