मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
राज्यात काही दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. तर येत्या दोन दिवसात पुन्हा राज्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान वर्तवली आहे. येत्या ४८ तासांत राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल, मंगळवारी कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल. पुढील दोन दिवस राज्यात हवामानाची स्थिती अशीच राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
या जिल्ह्यात पाऊस
कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. तर मुंबईसह ठाणे, पालघरमध्ये हलका पाऊस होईल. मध्य महाराष्ट्रातील नाशिक, सातारा, सांगली, कोल्हापूरमध्ये काही ठिकाणी मध्यम पाऊस पडेल.मराठवाड्यातील नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.