जळगाव : – महापालिकेत आयुक्त स्तरावरील लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले असून या लोकशाही दिनात नागरिकांनी आपले मुळ तक्रार अर्जासह उपस्थित रहावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने अतिरीक्त आयुक्त पल्लवी भागवत यांनी केले आहे.
दि.५ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता महापालिकेच्या दुसऱ्या मजल्यावरील सभागृहात सदर लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले असून ज्या नागरिकांनी १५ दिवसांपुर्वी मनपाकडे तक्रार, अर्ज किंवा निवेदन सादर केले असेल, अशा नागरिकांनी सकाळी १० वाजता सभागृहात हजर रहावे, असे कळविण्यात आले आहे.