“पिल्लू दोन मिनिटं सहन कर, जास्त त्रास होणार नाही”, प्रियकराने केले प्रियसीसोबत भयानक कृत्य

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

नवी मुंबईतून गायब झालेल्या एका 19 वर्षांच्या तरुणीच्या मृत्यू संदर्भात धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या महिन्याभरापासून बेपत्ता असलेल्या या तरुणीच्या हत्येचा गुड उलगडण्यास पोलिसांना यश आला आहे. वैष्णवी बाबर हिची हत्या तिच्या प्रियकराने केली आणि नंतर स्वतःचही जीवन संपवलं. त्यांनी लिहिलेल्या एका चिठ्ठीतील कोड मधून पोलिसांनी वैष्णवीच्या हत्तेचा आणि मृतदेहाचा तपास लावला त्याचवेळी पोलिसांनी तिची हत्या करणाऱ्या तरुणाच्या मोबाईल मध्ये एक व्हॉइस नोट सुद्धा सापडली. त्यामध्ये “पिल्लू दोन मिनिटं सहन कर, जास्त त्रास होणार नाही”. मग आपण दुसऱ्या जन्मात प्रवेश करू” असे समजूत काढणारा आवाज ऐकू आला.

24 वर्षे आरोपी वैभव बुरुंगळे खारघर येथे वैष्णवीची हत्या करून तिचा मृतदेह तिथेच सोडला. नंतर त्याने रेल्वेखाली स्वतःला झोकून देत जीवन संपवल. मात्र प्रेम कहाणीचा हा अंत कशामुळे झाला? हे जाणून घेऊया.

वैष्णवी बाबर (वय 19) आणि वैभव बुरुंगळे (वय 24) हे कळंबोली परिसरात जवळ राहायचे. दोघांचे एकमेकांवर प्रेम होतं. लग्नही करायचं होतं पण, कुटुंबीयांचा त्यांच्या लग्नास विरोध होता. १२ डिसेंबरला कॉलेजसाठी वैष्णवी घराबाहेर पडली. पण ती परत आलीच नाही. मुलगी वेपत्ता झाल्याने कुटुंबीयांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देखील दाखल केली. मात्र या तक्रारीला महिना उलटून केला तरी काहीच सुगावा लागला नाही.

अखेर या घटनेचा तपास गुन्हे शाखेच्या मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडे सोपविण्यात आला आणि तपासासाठी पथक नेमण्यात आलं. वैष्णवीच्या शोधासाठी या पथकाने तिच्या कॉलेज पासून तपास करायला सुरुवात केली. ती एका तरुणासोबत रेल्वेने प्रवास करत सीसीटीव्ही झाली. त्यानंतर खारघर स्थानकात उतरून ती टेकडीच्या दिशेने गेली. मात्र टेकडीवरून तरुण एकटाच खाली आला. त्यामुळे टेकडीवरच तिच्यासोबत घातपात झाल्याचा संशय पोलिसांना आला. त्यामुळे पोलिसांनी हत्तेपूर्वी वैष्णवीच्या तरुणांसोबत दिसली त्या तरुणाचा शोध घ्यायला सुरुवात केली. वैष्णवी बेपत्ता झाली त्याच दिवशी 12 डिसेंबरला एका तरुणाने जुईनगर स्थानकात आत्महत्या केल्याचे समोर आले होते. हा तरुण वैष्णवीचाच प्रियकर वैभव असल्याचे समोर आलं. वैष्णवीच्या मृत्यूपूर्वी तिच्यासोबत असलेल्या एकमेव साक्षीदाराच्या मृत्यूमुळे या प्रकरणाचा उलगडा करायचा कसा? हा मोठा प्रश्न पोलिसांसमोर होता.

मोबाईल मधून उलगडले गुड
अखेर हा गुंता सोडविण्यासाठी पोलिसांनी वैभवचा मोबाईल ताब्यात घेतला आणि त्यात त्यांना मोठा पुरावा मिळाला. या मोबाईल मध्ये पोलिसांना एक व्हॉइस नोटही सापडली होती. ज्यामध्ये “पिल्लू फक्त दोन मिनिटं त्रास होईल त्यानंतर आपण दुसऱ्या जन्मात प्रवेश करू” अशी तिची समजूत काढताना दिसत आहे. दोघांचे लग्न होणार नसल्याने ती माझी नाही झाली तर कोणाचीही होणार नाही, या भावनेतून वैभवने हत्येचा कट रचल्याचे समोर आले होते.

मृतदेह कसा सापडला वैभवनेच वैष्णवीची हत्या केल्याचे उघड झाले. तरी तिचा मृतदेह मिळाला नव्हता. तो कसा शोधायचा हा प्रश्नही लोकांसमोर उभा होता. तो पुरावा पोलिसांना वैभवच्या मोबाईल मधून मिळाला. त्याच्या मोबाईल मध्ये एक नोट होती. ज्यामध्ये “LO1-501′ हा कोड होता. पोलीस बरेच दिवस या कोडच रहस्य उलगडण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, हा कोड कुठला आहे. याचा सुगावा लागत नव्हता पोलिसांनी घटनास्थळी म्हणजेच टेकडीवर जाऊन तब्बल चार दिवस शोधही घेतला पण त्यांचा हाती काहीच लागले नाही

अखेर त्यांची नजर त्या टेकडीवरील झाडांवर पडली. त्यावर जनगणनेसाठी क्रमांक लिहिलेले होते. पोलिसांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने ‘LO1-501’ हा क्रमांक लिहिलेलं झाड शोधून काढले आणि ते तेथे पोहोचले. त्या झाडाजवळच कुजलेल्या अवस्थेत एक मृतदेह आढळला. त्यात तरुणीचा ड्रेस घड्याळ यावरून तिची ओळख पटवण्यात आली आणि ती मृत तरूणी वैष्णवीच असल्याचे समोर आले.

Leave A Reply

Your email address will not be published.