रिक्षाला लावलेल्या आगीत जीन्स कारखाना जळून खाक

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

रिक्षाला लावलेल्या आगीत जीन्स कारखानाच जाळून खाक झाल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. रिक्षा जालन्याच्या हेतूने ही आग लावण्यात आली होती. पण या आगीत जीन्स कारखान्याचे नुकसान झालं आहे.

उल्हासनगरच्या गायकवाड पाडा परिसरात अज्ञात समाजकंटकांनी रिक्षाला मध्यरात्री आग लावली, आणि ते पळून गेले. ही आग अतिशय भीषण होती. या आगीत संपूर्ण रिक्षाची जळून राख रांगोळी झाली आहे.

जीन्स कारखान्याला आग

धुराचे मोठे लोट निघत होते. ही आग खूपच जास्त होती. तिच्या झाला जवळ असलेल्या जीन्स कारखान्यापर्यंत पोहोचल्या होत्या. एवढच नाही तर, बाजूला लागलेल्या जीन्स कारखान्याला देखील ह्या आगीने आपल्या विळख्यात घेतलं होत. यात मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालं आहे. हनुमान मंदिर रस्त्यालगत शंकर धोत्रे हे नेहमीप्रमाणे रिक्षावर भाडेकरू सोडून रिक्षा पार्किंग करतात. रात्रीही त्यांनी तशीच रिक्षा पार्क केली होती. परंतु गुरुवार (दि.१) रोजी अज्ञात लोकांनी रिक्षाला आग लावली.

जीन्स कारखाना आणि रिक्षा आगीत खाक

ही आग इतकी भीषण होती की, बाजूला असेल्या जीन्स कारखान्याला देखील झळा पोहोचत होत्या. या जीन्स कारखाना आणि रिक्षा जळून खाक झाली आहे. दरम्यान ही आग कोणी लावली, का लावण्यात आली याचा तपास अधिक शिवाजीनगर पोलीस करत आहेत. यात मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झालं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.