चिखलामुळे काशिनाथ लॉज चौकात दुचाक्या घसरल्याने एमआयडीसी पोलिसांनी नागरिकांच्या सहकार्याने रस्ता धुवून काढला

0

जळगाव;-एमआयडीसी परिसरात असणाऱ्या काशिनाथ लॉज चौकात पावसामुळे निर्माण झालेल्या चिखलामुळे अनेक दुचाकी घसरल्याने किरकोळ अपघात झाल्याने याची एमआयडीसी पोलिसांनी दखल घेऊन एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहाय्यक फौजदार अतुल वंजारी यांनी नागरिकांच्या मदतीने या रस्त्यावर पाण्याचा फवारा करून रस्ता धूवून काढला.

यामुळे काशिनाथ लॉज चौकात किरकोळ अपघात होत असल्याचे लक्षात आल्यानंतर सहाय्यक फौजदार अतुल वंजारी यांनी तत्परता दाखवून या रस्त्यावर पाण्याचा फवारा करून चिखल बाजूला सारला . रात्री एखादा मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता आली नसती.त्यामुळे दुचाकी धारकांचे किरकोळ अपघात टळल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण दिसून आले. याबाबत एमआयडीसी पोलिसांचे कौतुक होत आहे. दरम्यान याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी सुद्धा अतुल वंजारी यांचे कौतुक केले.

Leave A Reply

Your email address will not be published.