भडगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क
जनावरांना पाणी पाजण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पाय घसरून जामदा नदीच्या कालव्यात पडल्याने बुडून मृत्यू झाला. मयूर नरेंद्रसिंग ठाकरे (रा. गणेशपुरा, ता. साक्री) असे त्याचे नाव आहे. ही घटना मंगळवारी दुपारी घडली.
मयूर हा सुटीच्या दिवशी मामांना मदत म्हणून शेतात जात होता. त्यानुसार मंगळवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास मयूर बैलांना पाणी पाजण्यासाठी कालव्यावर गेला. यावेळी पाय घसरल्याने तो कालव्यात वाहून गेला. त्याला पोहता येत नसल्यामुळे थोड्याच वेळात तो बुडाला. बराच वेळ झाल्यानंतरही मयूर परत न आल्याने शोधाशोध केली. तेव्हा काही अंतरावर तो सापडला. गावकऱ्यांनी त्याला तत्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
मयुर बीएससीच्या शेवटच्या वर्षाला असल्यामुळे तो परीक्षा संपल्यावर दोन दिवसात आई वडिलांकडे जाणार होता, परंतु, भेट अधुरीच राहिली. याबाबत भडगाव पोलिस स्टेशनला आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास हे. कॉ. कैलास गीते व दत्ता मगर करत आहेत.