डोहात बुडून दोन शाळकरी मुलांचा मृत्यू

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जळगाव तालुक्यातील शिरसोली गावाजवळ असलेल्या धारागिर शिवारातील पाण्याच्या डोहात दोन शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना दुर्देवी घटना आज दुपारी घडली.

शिरसोली गावाजवळील धारागिर शिवारातील पाण्याच्या तलावात पोहण्यासाठी जय जालींदर सोनवणे, निलेश राजेंद्र मिस्त्री (वय १७) आणि सुर्यवंशी शिवाजी पाटील (वय १५) दोन्ही रा. भोलानाथ नगर, शिरसोली जळगाव हे आज दुपारी गेले होते. यावेळी पाण्यात पोहतांना निलेश मिस्त्री आणि सुर्यवंशी पाटील यांना पाण्याचा अंदाज न असल्याने दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असून जय सोनवणे हा थोडक्यात बचावला आहे.

या घटनेची माहिती मिळताच नागरीकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान गावातील विलास भिल्ल, हिरामण प्रताप भिल्ल, संदीप भिल्ल या तरूणांच्या मदतीने दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. घटनास्थळी  नागरीकांची मोठी गर्दी केली होती. दोघांचे मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.