जळगावातील इसमाची तणावातून आत्महत्या

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

तीन महिन्यांपूर्वी पत्नी व मुले सोडून गेल्यानंतर कायम तणावात असलेल्या इसमाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना जळगाव शहरात उघडकीस आली आहे. मेहरूणच्या रेणुका नगरात हि घटना घडली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जळगावातील रेणुकानगरातील संतोष वामन भावसार (वय ४२) असे मयत इसमाचे नाव आहे. मेहरूण परिसरातील रेणुका नगरात ते एकटे वास्तव्यास होते.
त्यांची पत्नी तीन महिन्यांपासून तीन मुलांसहित घर सोडून निघून गेल्या आहेत. दरम्यान सोमवारी ते सकाळपासून घराच्या बाहेर निघालेच नाही. यामुळे शेजाऱ्यांनी संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास संतोष भावसार याना आवाज दिला. कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याने घरात डोकावून पाहिले असता, ते गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसले.

पोलिसांना दिली माहिती
यानंतर शेजाऱ्यांनी तातडीने एमआयडीसी पोलिसांना घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे डॉक्टरांनी तपासणी नंतर त्यांना मृत घोषित केले. संतोष भावसार यांच्या बहिणींना माहिती दिल्यावर त्यांनी एकच आक्रोश केला. घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.