जळगाव येथे अन्नधान्य, फळे, भाजीपाला महोत्सव आयोजित, वाचा सविस्तर

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

 

धान्य महोत्सवामध्ये शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला शेतमाल ‘शेतकरी ते ग्राहक थेट विक्री’ या संकल्पनेतून ग्राहकांना योग्य दरात उपलब्ध होणार आहे. वर्षभरासाठी आवश्यक धान्य जसे गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ, कडधान्ये, डाळी व इतर उत्पादने खरेदीची सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, प्रकल्प संचालक आत्मा व जिल्हा परिषदेतर्फे २८ ते ३० एप्रिल या कालावधीत जी. एस. ग्राउंड, जळगाव (Jalgaon) येथे अन्नधान्य, फळे, भाजीपाला महोत्सव व शासकीय योजनांची जत्रा भरविण्यात येणार आहे.

 

बाजरी प्रात्यक्षिके, वैयक्तिक शेततळे, फळबाग लागवड, पीएमएफएमई, पोक्रा योजनांचे ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी सोबत सातबारा खाते उतारा, आधारकार्ड व बँक पासबुक छायांकित प्रत सोबत आणावी. शेतकरीबंधू, सर्व नागरिकांनी वरील कालावधीत या संधीचा लाभ घ्यावा असे प्रकल्प संचालक, आत्मा तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.