भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या एकावर चाकूने हल्ला

0

चोपडा :- भांडण सोडवण्यासाठी गेले असता एकावर चौघांनी वाद घालीत चाकूने हल्ला केल्याची घटना तिरंगा चौकात घडली . याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील धरणगाव नाक्याजवळील महात्मा गांधी गार्डननजीक असलेल्या – तिरंगा चौकात काही व्यक्ती भांडण करत होते. हे भांडण सोडवण्यासाठी चेतन सुभाष कानडे गेला असता आरोपीने त्यांची ताब्यातील स्विप्ट कार (जीजे- ०५, आरक्यू २८१५) मधुन चाकू काढून चेतन सुभाष कानडे याच्या पोटावर उजव्या बाजूला दोन वेळा वार ‘केले. तसेच अन्यत्र चाकू मारुन गंभीर जखमी करुन ठार मारण्याचा प्रयत्न केला. तसेच, विवेक पाटील, हितेष मिस्तरी, दीपक पाटील, रोहित पाटील यांनी फिर्यादी सचिन सोनवणे यांस शिवीगाळ व धक्काबुक्की करुन ठार मारण्याची धमकी दिली. तसेच त्यांच्याजवळील स्विप्ट कारमध्ये बसून ते पळून गेले. या प्रकरणी सचिन सुधाकर सोनवणे (वय ४०, रा. अरुण नगर, चोपडा) यांच्या फिर्यादीवरून चोपडा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.