भारत-पाकच्या सामन्यात बदल, ‘या’ दिवशी खेळला जाणार सामना

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

भारतात 5 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या वनडे वर्ल्डकपमध्ये (ODI World Cup) भारत (India) आणि पाकिस्तान (Pakistan) यांच्यातील सामन्यात आता बदल करण्यात आले आहे. हा आधी 15 ऑक्टोबरला खेळला जाणार होता. मात्र बीसीसीआयने (BCCI) सुरक्षा एजन्सीच्या विनंतीनुसार या सामन्याच्या तारखेत बदल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा सामना एक दिवस आधी म्हणजे 14 ऑक्टोबरला खेळाला जाण्याची शक्यता आहे.

गेल्या महिन्यातच बीसीसीआयने वनडे वर्ल्डकपचे पूर्ण वेळापत्रक जाहीर केले होते. या वेळापत्रकानुसार भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय व्होल्टेज सामना हा 15 ऑक्टोबर घटस्थापनेच्या दिवशी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना होणार होता.

मात्र बीसीसीआयला सुरक्षा एजन्सींनी या सामन्याची तारीख बदलावी अशी विनंती केली होती. नवरात्रीचा पहिला दिवस असल्याने गुजरातमध्ये गरबा खेळण्यासाठी प्रचंड गर्दी असते. त्यात भारत आणि पाकिस्तान यांचा सामना झाल्यास सुरक्षा यंत्रणांची तारंबाळ उडण्याची शक्यता आहे. बीसीसीआयने देखील या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेत त्वरित बैठक घेतली होती. या बैठकीतच सामन्याची तारीख बदलण्यात येणार यावर शिक्कामोर्तब झाले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.