लोकशाही न्यूज नेटवर्क
चहा हे सर्वांचे आवडते पेय आहे. म्हणून आपल्या देशात चहा प्रेमी खूप आहेत. त्यातच आपल्याला सर्वात जास्त मसाला चहा प्यायला आवडतो. चहाचे अनेक फायदे आहेत मात्र त्याचे दुष्परिणाम देखील तितकेच आहेत.
सर्वांना स्वादिष्ट आणि कडक चहा प्यायला आवडतो. मसाला चहामध्ये अनेक प्रकारच्या मसाल्यांचा वापर केला जातो. यात दालचिनी, वेलची, आले, तुळस, काळी मिरी, एका जातीची बडीशेप, लवंग इत्यादी मसाले वापरले जातात. हे मसाले आपल्या आरोग्यासाठी देखील गुणकारी आहेत. यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि पचनशक्तीही चांगली राहते. मात्र हा मसाले चहा उन्हाळ्यात तुमच्या आरोग्यासाठीही हानिकारक ठरू शकतो.
या अनेक मसाल्यांमुळे चहा उष्ण ठरतो. ज्यामुळे शरीरावर दुष्परिणाम होतात. या मसाला चहाचे जास्त सेवन केल्याने पोटदुखी, बद्धकोष्ठता, पोट फुगणे, पोटात जळजळ यासारख्या समस्या उद्भवू शकतात. तसेच मसाला चहामध्ये कॅफिन जास्त प्रमाणात असते जे आरोग्यासाठी घातक आहे. कॅफिनमुळे तणाव वाढू शकतो. उच्च रक्तदाबाची समस्याही उद्भवते. या मसाला चहामध्ये वापरण्यात आलेली काळी मिरीमुळे पोटात आणि डोळ्यांमध्ये जळजळ होऊ शकते. इतकेच नाहीतर गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या स्त्रियांना या चहाच्या सेवनामुळे अॅलर्जी होऊ शकते.
म्हणून दिवसातून एकच कप मसाला चहा प्या. उन्हाळ्याच्या दिवसात प्रामुख्याने चहाचे सेवन टाळा. चहाच्या टपरीवरील मसाला पिण्यापेक्षा ताज्या मसाल्यांचा वापर करून घरी मसाला चहा बनवा. तसेच मसाला चहाचे सेवन रात्री करू नये. यामुळे मसाले चहामुळे नक्कीच तुमच्या आरोग्यावर दुष्परिणाम होणार नाही.