भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क
कंडारी ता. भुसावळ येथील तिहेरी हत्याकांड प्रकरणी आज दि. ०४ सप्टेंबर २०२३ रोजी अजून तीन आरोपींना पोलीसांनी अटक करून भुसावळ न्यायालयात न्यायाधीश एस. व्ही. जंगमस्वामी यांच्या समोर हजर केले असता सरकारी वकील नितीन खरे यांनी युक्तीवाद करून पोलीस कस्टडीची मागणी केली. न्यायालयाने त्या तीनही आरोपींना ७ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. पोलीस कोठडी सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे, देविदास मधुकर पवार (भील), अमोल रविंद्र कोळी, मयुर लिलाधर तायडे (कोळी) सर्व रा. कंडारी, ता. भुसावळ यापूर्वी तीन आरोपींना दिपक छगन तायडे, मनोज श्रावण मोरे व किरण भागवत सपकाळे यांना न्यायालयाने ७ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आता अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या सहा झालेली असून अजून ४ आरोपींना अटक करणे बाकी असल्याची माहिती सरकारी वकील नितीन खरे यांनी न्यायालयाला युक्तीवाद करतांना दिली.