जळगाव ;- गेल्या काही दिवसांपासून सोने चांदीच्या भावात घसरण पाहायला मिळत असताना आज १४ रोजी सकाळी ११ वाजता जळगावच्या सुवर्ण बाजारात सोने आणि चांदीच्या दराने जबरदस्त उसळी घेतली असल्याचे चित्र पाहायला मिळाले.
काल जळगावच्या सराफ बाजारात सोने प्रति दहा ग्रामला 61,200 रुपये असंताना आज त्यात 1,250 रुपयांची वाढ होऊन सोने 62,450 रुपयांपर्यंत पोहचले . तर चांदी १३ रोजी प्रति किलो 71,340 असताना यात आज १४ रोजी 2,830 रुपयांची वाढ होऊन ती 74,170 रुपये इतकी वधारली . दरम्यान सोने चांदी वर्ष अखेरीस ७० हजारांचा टप्पा गाठणार असे जाणकार तज्ज्ञ सांगतात. तसेच चांदीही प्रति किलो ७५ हजार रुपयांपर्यंत पोहोचेल असेही म्हटले जात आहे.