गिरणा नदी काठावरील नागरिकांना सुरक्षिततेचा इशारा

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

आज दिनांक १४/०७/२०२२ रोजी गिरणा धरणात (Girana Dam)दुपारपर्यंत ८० टक्के जिवंत साठा होईल, वरून येणारा पुराचा येवा बघता व धरण सुरक्षिततेचा आढावा घेऊन आज दुपारनंतर गिरणा धरणातून जास्तीचे पुराचे पाणी खाली गिरणा नदीत सोडण्यात येणार आहे, तरी नदी काठावरील नागरिकांनी सावध रहावे.

कोणतीही जीवित व वित्त हानी होणार नाही याची काळजी घ्यावी, पुराचा प्रवाह हा पाणलोट क्षेत्रातून येणाऱ्या येवा प्रमाणे कमी जास्त करण्यात येईल. साधारणतः धरणातून करण्यात येणारा विसर्ग हा सुरवातीला २०००० क्यूसेक इतका राहील व तदनंतर पाणलोट क्षेत्रातून येणाऱ्या येवानुसार विसर्ग १००००० क्यूसेक पर्यंत जाण्याची शक्यता आहे.

तो येणाऱ्या येवानुसार वेळो वेळी कमी जास्त होऊ शकतो, तरी सर्वांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासन, जळगाव व कार्यकारी अभियंता, गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव व यांच्या वतीने करण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.