धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
धरणगाव तालुक्यातील बांबुरी गावातील आशिष शिरसाळे (वय२२) या तरुणाची गिरणा नदीपात्रात निर्घृण हत्या करण्यात आली आहे. हि घटना शुक्रवारी रात्री ८ ते ९ वाजेच्या सुमारास घडली. या हत्येमुळे संपूर्ण धरणगाव तालुका हादरला आहे.
सूत्रांनुसार, आशिष रात्री जेवणानंतर शौचास बाहेर जातो असे सांगून, घराबाहेर पडला. आशिष खूप वेळ झाला तरी घरी परतला नाही. कुटुंबीयांनी त्याचा शोध घ्यायला सुरुवात केली असता, गिरणा नदीपात्रात याचा अमानुषपणे खून झाल्याचे समोर आले. या प्रकरणी धरणगाव पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल झाला असून, घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस अधीक्षक हृषीकेश रावले, एलबीसी पोलीस अधिकारी निरीक्षक किसन पाटील, पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे, सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद कठोरे यांनी भेट दिली.या ठिकाणी श्वानपथक मागविण्यात आले होते. जिल्हा पोलिस अधीक्षकांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे.