नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क
कोरोना प्रकरणात सातत्याने घट दिसत असल्याने केंद्र सरकारने बुधवारी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कोरोना निर्बंध संपवण्यास सांगितले.
Centre asks states, UTs to end additional COVID-19 restrictions amid decline in cases
Read @ANI Story | https://t.co/gWK458Ip78#COVID19 pic.twitter.com/290ufWNgtc
— ANI Digital (@ani_digital) February 17, 2022
केंद्र सरकारने राज्यांना निर्बंध हटवण्यासंदर्भात पत्र लिहिलं आहे. निर्बंधांची समीक्षा करावी असे आदेश केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्यांना दिले आहेत.
केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे, “भारतात कोरोना रूग्णसंख्या २१ जानेवारी पासुन सतत घसरत आहे. अतिरिक्त कोरोना निर्बंधांची समीक्षा करा आणि त्यात सुधारणा किंवा आवश्यकता नसल्यास ते निर्बंध हटवा. देशात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत चालली आहे.”