नवी दिल्ली ;- उत्तर प्रदेशच्या अमेठी आणि रायबरेली लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेस पक्षानं निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना रायबरेली मतदारसंघाच्या तर राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना अमेठी मतदारसंघाच्या निरीक्षकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. रायबरेली लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी निवडणूक लढवत आहेत.
अमेठीमधून काँग्रेसनं गांधी कुटुंबाचे नीकटवर्तीय किशोरी लाल शर्मा यांना उमेदवारी दिली आहे. राहुल गांधी पहिल्यांदाच रायबरेलीमधून निवडणूक लढवत आहेत. 1999 नंतर पहिल्यांदाच अमेठीमधून गांधी कुटुंबाचा सदस्य निवडणुकीच्या मैदानात उतरलेला नाही.