आडगावात तीन दिवसात 18 तास वीज पुरवठा खंडित..

0

 

चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

तालुक्यातील आडगाव परिसरात गेल्या तीन दिवसापासून ढगाळ वातावरण व सोसाट्याचा वारा सोडला तर वीजपुरवठा खंडित व्हायला दुसरे काही कारण नाही? परंतु तरीही वीज मंडळाच्या हलगर्जीपणामुळे 18 तास वीजपुरवठा खंडित राहिल्याने पाणीपुरवठा, पिठाची गिरणी व घरगुती वापरावर याचा परिणाम होताना दिसून येत आहे.

आडगाव युनिट अंतर्गत नारद, अंबाडे, बोरखडे, खरग. आदी गावांचा समावेश असून वीज गेल्यानंतर या गावांचा एकमेकांशी संपर्क तुटतो उन्हाळ्यात प्रामुख्याने दुपारच्या वेळेला विजेची जास्त गरज भासते अशा परिस्थितीत वीज नसल्याने जनतेचे हाल होतात वीज मंडळाने या संदर्भात तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी आडगाव परिसरातील नागरिकांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.