पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क
पाचोरा तालुक्यातील चिंचपुरा येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंचासह ९ सदस्यांना अतिक्रमण प्रकरणात जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी चिंचपुरा ग्रामपंचायतीची संपूर्ण कार्यकारणी अपात्र घोषित केल्याने अतिक्रमण धारकांचे धाबे दणाणले आहे.
तालुक्यातील चिंचपुरा येथील ग्रामस्थ बाळु भाऊराव पाटील यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे ग्रामपंचायत विवाद क्रं. ४०/२०२२ हा दावा दाखल केला होता. त्यावर जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी आदेश काढत महाराष्ट्र अधिनियम १९५९ चे कलम १४ (ज – ३) नुसार चिंचपुरा ता. पाचोरा ग्रामपंचायतीचे सरपंच अक्काबाई हुसेन तडवी, उपसरपंच सचिन अनिल कोकाटे, सदस्य मंगलाबाई सुनिल पाटील, ज्योतीबाई अजय बेलदार, प्रदिप जीवराम पवार, शरद नाना पाटील, वैशाली आबा पाटील, गायत्री स्वप्निल देवरे व गणेश उत्तम पवार यांना अपात्र घोषित केले आहे. अर्जदार बाळु पाटील यांच्यातर्फे अॅड. वसंत भोलाणकर यांनी काम पाहिले. या कार्यवाहीमुळे अतिक्रमण धारक तालुक्यातील अनेक ग्रामपंचायत सदस्यांवर अपात्रतेची टांगती तलवार असल्याने अतिक्रमण धारकांचे धाबे दणाणले आहे.