Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • चंद्रपूर जिल्ह्यात युवासेनेतर्फे ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा
    • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पत्रकार संघाकडून वृक्षारोपण
    • लोकप्रेमाचा महासागर उसळला..!
    • धरणगावात वृद्धाला गाठून जबरी लूट!
    • बंडाची तलवार म्यान?
    • बनावट कापूस बियाणे विक्रेत्याचा पर्दाफाश
    • जळगावात अंमली पदार्थ तस्करीविरोधात कारवाई
    • शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»बस वेळेवर लागत नसल्याने संतप्त विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन…
    जळगाव

    बस वेळेवर लागत नसल्याने संतप्त विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन…

    Tushar BhambareBy Tushar BhambareSeptember 28, 2022No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क:

    येथील बस स्थानकात शाळा सुटल्यानंतर एक वाजेची बस ही वेळेवर सुटत नसल्याने संतप्त विद्यार्थ्यांनी चक्क बस स्थानकात पाऊणतास बस रोको आंदोलन केले. लेखी आश्वासनानंतर सदर आंदोलन मागे घेण्यात आले.

    पारोळा तालुक्यात ११४ खेडे आहेत या गावांना एरंडोल व अमळनेर विभाग संयुक्तपणे बस सेवा पुरविते यांचा सर्व कारभार अमळनेर विभाग पाहत असतो, ग्रामीण भागातून पारोळा शहरात शिकण्यासाठी सुमारे चार ते पाच हजार विद्यार्थी हे नेहमी दररोज बसने अपडाऊन करतात. या पार्श्वभूमीवर अमळनेर आगाराकडून वेळेवर बस सोडल्या जात नसल्याने, शाळा सुटुन देखील विद्यार्थ्यांना तासंतास बस स्थानकात बसची वाट पाहत ताटकळत रहावे लागते, त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात हाल सोसावे लागत आहे, आज तामसवाडी करमाड, रताळे येथील शाळेतील विद्यार्थी बारा वाजता बस स्थानकात आले असता, त्यांना जाण्यासाठी दुपारी एक वाजेची सुटणारी बस आज अडीच वाजेपर्यंत लागलीच नव्हती हे आजचे नसून एक दिवसाआड नेहमीच असेच होत असल्याने सकाळपासून शाळेत आलेले भुकेले विद्यार्थी घरी जाण्यासाठी ताटकळत होते. संतप्त विद्यार्थ्यांनी बस स्थानकाच्या आवारातच मुख्य प्रवेशद्वाराजवळ  खाली बसून रस्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनात किमान दीडशे ते दोनशे विद्यार्थी सहभागी झाले होते. अर्धा ते पाऊण तासापर्यंत रस्ता रोको करण्यात आला.

    यामुळे बस स्थानकातून एकही बस जात नव्हती व येतही नव्हती यानंतर माजी पालकमंत्री डॉ, सतीश पाटील यांनी अमळनेर आगार प्रमुख चौधरी यांच्याशी या विद्यार्थ्यांनी भ्रमणध्वनीवर बोलणे झाले. त्यानंतर स्थानक प्रमुख संजय पाटील यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले, तोपर्यंत स्थानकात व आजूबाजूच्या परिसरात वाहतुक कोंडी झाली होती. यानंतर तीन वाजेच्या सुमारास ०४१९ क्रमांकाची तामसवाडी, करमाळ, रताळे बस या मार्गासाठी सोडण्यात आली.

    #aandolan #bus #protest Parola
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    चंद्रपूर जिल्ह्यात युवासेनेतर्फे ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा

    June 6, 2026

    जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पत्रकार संघाकडून वृक्षारोपण

    June 6, 2026

    लोकप्रेमाचा महासागर उसळला..!

    June 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif