भारतीय रेल्वेसाठी 2.4 लाख कोटींचा निधी -अर्थमंत्री

0

नवी दिल्ली लोकशाही न्यूज नेटवर्क

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी आज (बुधवार, दि 1 फेब्रुवारी) रोजी केंद्रीय अर्थसंकल्प 2023 संसदेत सादर केला. यावेळी अर्थमंत्री सितारमन यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत.नरेंद्र मोदी यांच्या काळातील हे नववे बजेट आहे तर निर्मला सितारमन यांनी सलग पाचव्यांदा अर्थसंकल्प सादर केला.

रेल्वे अर्थसंकल्प आता केंद्रीय संकल्पातच मांडला जातो. त्यामुळे भारतीय रेल्वेसाठी काय मिळणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. त्यानुसार मोदी सरकारने भारतीय रेल्वेसाठी तब्बल 2.4 लाख कोटींचा निधी देणार असल्याचे सांगितले. यासह देशात तब्बल 50 नवीन विमानतळे आणि हेलिपॅड उभारणार असल्याचीही घोषणा बजेटमध्ये करण्यात आली. याद्वारे देशातीस हवाई संपर्क वाढेल, असा आशावाद व्यक्त करण्यात आला. यासह केंद्रीय अर्थमंत्र्यानी बजेटमध्ये अनेक मोठमोठ्या घोषणा केल्या आहेत.

अर्थसंकल्प सादर करताना सुरुवातीलाच, भारताच्या ‘अमृतकाळातलं’ पहिलं अर्थसंकल्पीय भाषण असल्याचे सांगताना भारताच्या 100व्या वर्षाच्या वाटचालीकडे नेणारा हा अर्थसंकल्प असेल असे निर्मला सितारमन म्हणाल्या. तसेच, सरकारच्या वेगवेगळ्या योजनांची माहिती देताना, PM आवास योजना, किसान सम्मान निधी, कोरोना लसीकरण आदींची माहिती सभागृहाला दिली. ग्रामीण महिलांचं सशक्तीकरण, हस्तकलेच्या कलाकारांना बळ, पर्यटनाला प्रोत्साहन आणि ग्रीन ग्रोथ या चार गोष्टी अमृत काळात पुढे जाताना महत्वाच्या असल्याचे त्यांनी सांगितले.

केंद्रातील मोदी सरकारचा हा निवडणूकपूर्वीचा अर्थसंकल्प असल्याने सर्वांचेच या अर्थसंकल्पाकडे लक्ष लागून राहिले होते. आज (बुधवार) सकाळी राष्ट्रपती दौपती मुर्मू यांनी केंद्रीय अर्थसंकल्पाला औपचारिक मंजूरी दिली. त्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीतही अर्थसंकल्पाला मंजूरी देण्यात आली. त्यानंतर अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी संसदेत हा अर्थसंकल्प सादर केला. यंदाही सितारमन यांनी डिजीटल पद्धतीने अर्थसंकल्प सादर केला.

Leave A Reply

Your email address will not be published.