भाजप स्थापना दिनानिमित्त भाजपचे बूथ विजय अभियान- अजित चव्हाण

0

जळगावः – येत्या ६ रोजी भारतीय जनता पार्टीचे स्थापना दिनानिमित्त भारतीय जनता पार्टीचे बूथ विजय अभियान होणार असल्याची माहिती देऊन प्रत्येक बुथवर ३७० मते वाढवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे भाजप प्रदेश प्रवक्ते . लक्ष्मण सावजी, प्रदेश सहमुख्य प्रवक्ता अजित चव्हाण यांनी संयुक्तरीत्या पत्रकारांना संबोधित केले.

याप्रसंगी आ. राजूमामा भोळे , महानगर जिल्हाध्यक्षा सौ. उज्वलाताई बेंडाळे ,दीपक सूर्यवंशी,विशाल त्रिपाठी आदी उपस्थित होते
लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा एक भाग म्हणून भारतीय जनता पार्टीतर्फे राज्यभर 3 एप्रील पासून सहा दिवसीय बूथ विजय अभियान राबवण्यात येणार आहे. सहा दिवसीय बूथ विजय अभियान’ अंतर्गत प्रत्येक बूथवर मागच्या निवडणुकीपेक्षा ३७० मते वाढवण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात येणार असून याद्वारे महायुतीच्या उमेदवाराच्या विजयाचे मताधिक्य वाढवण्याचे प्रयत्न केले जाणार असल्याचे अजित चव्हाण यांनी सांगितले..

घरोघरी पत्रके पोहोचवून मतदारांशी भेट संपर्क साधणे, प्रत्येक घर व वाहनावर स्टिकर्स लावणे, नियमित संपर्कात राहणे, प्रत्येक कार्यकर्त्याच्या घरी भाजपाचा झेंडा लावणे आदी उपक्रम राबवले जातील. युवा वर्ग, महिला असे समाजातील विविध घटकासाठी ५ समूह बैठकाही घेण्यात येतील अशी माहिती अजित चव्हाण यांनी दिली, भाजपा विरोधी समजल्या जाणाऱ्या मतदारांपर्यंत मोदी सरकारचे कार्य योजना पोहोचवून भाजपाला मत देभ्यासाठी त्यांचे मन वळवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. बूथ पासून दूर रहाणा-या मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात येणार आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.