मंत्रीपद नाही मिळालं… बच्चू कडू यांची प्रतिक्रिया…

0

 

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क;

राज्यात राजकीय भूकंप होऊन काळ लोटला, सत्ता परिवर्तन झाले आणि अखेर आज बहुप्रतीक्षित मंत्रिमंडळाचा विस्तारही झाला. मात्र त्यात बच्चू कडू यांना स्थान ण मिलायाने ते नाराज असल्याच वृत्त समोर येत होते. आता त्यांची यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

ते मीडियाशी बोलतांना म्हणाले की, मंत्रीपद नाही दिलं तर भांडायचं का? असं सवाल त्यांनी विचारला आहे. बच्चू कडू एवढ्या लहान विचांराचा नाही, असंही ते यावेळी म्हणाले आहेत.

“मंत्रीपद मिळालं तरी चांगलं आणि नाही मिळालं तरी चांगलं आहे. आमचा उद्देश केवळ मंत्रीपद मिळवणं हा नाही. मी एवढ्या लहान विचारांचा माणूस नाही. पण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मला मंत्रीपदाचा शब्द दिला आहे. ते त्यांचा शब्द नक्की पूर्ण करतील.” असेही बच्चू कडू म्हणाले.

“मंत्रीपद नाही मिळालं तरी चांगलं” या बच्चू कडूंच्या विधानाबाबत प्रश्न विचारला असता, बच्चू कडू म्हणाले की, “मंत्रीपद नाही दिलं तर त्यांना भांडायचं का? तेही स्वत: साठी भांडायचं का? शेतकऱ्यांसाठी भांडू की… मी काही कॅबिनेटपेक्षा कमी नाही. बच्चू कडू अकेलाही काफी है, सब के लिए…” असंही कडू यावेळी म्हणाले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.