विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

0

जळगाव ;- साईनगरात विवाहितेने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील मन्यारखेडा शिवारातील गुरूवारी २४ एप्रिल रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास उघडकी आहे . याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात शुक्रवारी २६ एप्रिल रोजी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, ही आत्महत्या नसून तिच्या पतीने मारहाण करून तिला गळफास दिल्याचा आरोप विवाहितेच्या माहेरच्यांनी केला आहे.

ममता रतिलाल राठोड (वय ३०, रा. साईनगर, मन्यारखेडा शिवार, ता. जळगाव) असे मयत विवाहितेचे नाव आहे. तालुक्यातील मन्यारखेडा शिवारातील साईनगर येथे ममता राठोड पती रतीलाल भोजू राठोड आणि एक मुलगा आणि मुलगी यांच्यासोबत वास्तव्याला होत्या. मोलमजूरी करून त्या उदरनिर्वाह करत होत्या. दरम्यान, गुरूवारी २४ एप्रिल रोजी रात्री १० वाजता राहत्या घरात ममता यांनी साडीने गळफास घेवून आत्महत्या केली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर शेजारी राहणाऱ्या नातेवाईकांनी धाव घेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. सुशांत निकुंभ यांनी मयत घोषीत केले. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.