धरणगाव येथे शेतकऱ्याची झाडाला गळफास घेऊन आत्महत्या

0

धरणगाव :- येथील रहिवाशी असलेल्या एका ५५ वर्षीय शेतकर्याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली असून त्यांनी कर्जबाजारी पणाला कंटाळून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

शहरातील मोठा माळी वाड्यातील रहिवासी राजेंद्र सुकलाल महाजन (वय ५५) हे २३ रोजी रात्री धरणगाव शिवारातील त्याचा स्वतःच्या शेतात लिंबाचा झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यांनी नापिकीमुळे हे पाऊल उचलून गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे कुटुंबीयांकडून सांगण्यात आले.

दरम्यान, त्यांच्यावर सोसायटीचे कर्ज होते. त्याच्या पश्चात पत्नी, मुलगा, सुन, ४ मुली, भाऊ असा परिवार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.