अपघातप्रकरणी चालकावर गुन्हा दाखल झाल्यानंतर मयत युवकावर अंत्यसंस्कार

0

लोकशाही न्युज नेटवर्क

वीरवली येथे अपघातामध्ये जखमी झालेल्या कोरपावली येथील युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने त्याच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल न झाल्याने संतापात नातेवाईकांनी मयत युवकाचा मृतदेह पोलीस ठाण्यात आणून अंत्यसंस्कार न करण्याचा पवित्रा घेतल्याने अखेर चालकावर गुन्हा दाखल केल्यांनतर मयतावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

कोरपावली येथील अरुण किशोर भालेराव वय २५ आणि त्याचा मित्र विजय संजय इंगळे हे १० जानेवारी रोजी दुचाकीने कोरपवली येथून यावलकडे जात होते . विरवली गावाजवळ खलील रफिक तडवी रा. कोरपावली ता. यावल हा ट्रॅक्टर चालवीत येत असताना त्याने या दोघांना जोरदार धडक दिली. या धडकेत दोघे जखमी झाले. यातील अरुण किशोर भालेरावगंभीर जखमी झाल्याने त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते . मात्र त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

या अपघाताला जबाबदार असलेल्या ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी नातेवाईकांनी मयत युवकाचा मृतदेह पोलीस स्टेशनला आणल्याने याठिकाणी बराचवेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांनी मयताच्या आप्तांशी संवाद साधून या प्रकरणाचा नशिराबाद पोलिसात नोंद झालेली आहे त्यावरून आता या पुढील गुन्हा यावल पोलिसात दाखल होईपर्यंत रफिक तडवी यांचे विरोधात भादंवि कलम 304 अ 279 337 427 मोटार वाहन कायदा 184 134 ब अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. गुन्हा दाखल झाल्यावर मयताच्या नातेवाईकांनी मृतदेहावर अंत्यसंस्कार केले.

Leave A Reply

Your email address will not be published.