मुंबई , लोकशाही न्यूज नेटवर्क
धर्मेंद्र आणि अमिताभ बच्चन ही बॉलिवूडची प्रसिद्ध नावे असून मुकेश अंबानी यांची देशातील सर्वात श्रीमंत कुटुंबांमध्ये गणना केली जाते. त्याचबरोबर या सेलेब्सची सुरक्षाही खूप कडक आहे. मात्र, असे असतानाही त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. मुंबई पोलिसांना एक अनोळखी फोन आल्याचे वृत्त आहे, ज्यामध्ये या तीन मोठ्या कुटुंबांच्या बंगल्यावर बॉम्ब हल्ला करणार असल्याची धमकी देण्यात आली आहे.
पीटीआयच्या वृत्तानुसार, एका अधिकाऱ्याने मंगळवारी सांगितले की, येथील पोलिस नियंत्रण कक्षाला अभिनेते अमिताभ बच्चन, धर्मेंद्र आणि उद्योगपती मुकेश अंबानी यांचे बंगले बॉम्बने उडवणार असल्याचा फोन आला आहे. मुंबईजवळील पालघरमधील शिवाजी नगर परिसरात हा कॉल करण्यात आला होता, त्याबाबत अधिक तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
माहितीनुसार, 112 हेल्पलाइनवर कॉल आला होता, त्याचा कंट्रोल रूम नागपूर शहरातील लकडगंज भागात आहे. अमिताभ बच्चन, धर्मेंद्र आणि मुकेश अंबानी यांचे बंगले उडवण्यासाठी 25 लोक मुंबईत आले आहेत, अशी चर्चा करणाऱ्या दोन तरुणांचा फोन पोलिस अधिकाऱ्याने ऐकले. त्याचवेळी मुंबई पोलिसांना सतर्क करण्यात आले असून पोलिसांनी तपास सुरू केला असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले आहे.
अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र हे इंडस्ट्रीतील दिग्गज अभिनेत्यांपैकी एक आहेत, अंबानी कुटुंबाबद्दल बोलायचे झाले तर, अलीकडेच न्यायालयाने त्यांना झेड प्लस सुरक्षा देण्यास सांगितले आहे.