लोकशाही न्यूज नेटवर्क
जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी पालपासून तब्बल ८७ किलोमीटर अंतरावर असलेल्या जामन्या-गाडर्या, लंगडा आंबा आदी दुर्गम भागातील आदिवासी पाड्यांवर आपली संक्रांत साजरी केली.कडाक्याच्या थंडीत कुडकुडणाऱ्या पाड्यांवरील मुलांना स्वेटर, मोजे देऊन त्यांना मायेची उबही पुरविली.तेथील आदिवासींच्या समस्या जाणून घेत त्यांना आवश्यक वस्तूही पुरविल्या.
अमन मित्तल यांनी आदिवासी बांधवांशी चर्चा करून संवाद साधला. . याप्रसंगी जिल्हाधिकाऱ्यांसोबत महसूल आणि कृषी खात्यातील अधिकार्यांची उपस्थिती होती. त्यांनी परिसरात शासनातर्फे राबविण्यात येणारे विविध उपक्रम आणि योजनांची माहिती देखील दिली.