आसाम, लोकशाही न्यूज नेटवर्क;
आसाम-मेघालय सीमेवर आसाममधील गोलपारा जिल्ह्यात जंगली हत्तीच्या हल्ल्यात एका लहान मुलासह किमान तीन जण ठार झाले. आसाम-मेघालय सीमेवर लखीपूरजवळील कुरंग गावात सोमवारी पहाटे ही घटना घडली.
वन अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मेघालयातील जवळच्या डोंगराळ भागातून जंगली हत्तींचा कळप अन्नाच्या शोधासाठी या भागात येत होता आणि त्यांनी लोकांवर हल्ला केला. हत्तीच्या हल्ल्यात एका लहान मुलासह तीन जणांचा मृत्यू झाला. ही घटना आसाम-मेघालय सीमेवर घडली, असे लखीपूरचे वन परिक्षेत्र अधिकारी ध्रुबा दत्ता यांनी सांगितले.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, जंगली हत्तींनी अनेकदा या भागात येऊन मालमत्तेचे नुकसान केले आहे. गेल्या महिन्यात गुवाहाटीमधील अमचिंग जोरबत परिसरात एका जंगली हत्तीने एका तरुणावर हल्ला केला होता.
मे महिन्यात आसामच्या गोलपारा जिल्ह्यात दोन महिलांसह एका कुटुंबातील तिघांचा जंगली हत्तींनी तुडवून मृत्यू केला होता.
ही घटना गोलपारा जिल्ह्यातील लखीपूर वनपरिक्षेत्रातील सालबारी अंगतिहारा गावात घडली.