शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळण्यासाठी भाजपाचे तहसीलदारांना निवेदन

0

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

गेल्या महिन्याभरापासून अमळनेर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी पावसामुळे उरल्या सुरल्या खरिप पिकांचे चिखल झाले आहे . झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांच्या डोळयातून अश्रुंचा पुर वाहु लागला आहे .अशा  संकटाच्या काळात बळी राजाला धीर देणे अत्यंत गरजेचे आहे. म्हणून अमळनेर तालुक्यात सर्वच पिकांचे १०० % नुकसान झाले असून पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचा फार्स न करता पिकपेरा निहाय सरसकट मदत जाहिर करण्याचे आदेश दयावे.

पावसामुळे मोठया प्रमाणात शेती पिकांची हानी झाली आहे . हजारो हेक्टर जमीनी पुरात खरडुन गेल्या. बहुतांश गावांना शेतात पाणी तुडूंब भरुन हाता तोंडाशी आलेले कपाशी , ऊस , मका , ज्वारी , बाजरी , आदी सर्व पिके खराब झाली आहेत. आधीच  मुंग, उडीद, सोयाबीन हातातुन गेलेली आहे. कापसावर लाल्या व बोंड काळी पडली आहेत. तसेच फुटलेल्या कपाशीला कोंब आले आहेत . त्यामुळे शेतकरी मोठया प्रमाणात सापडलेला आहे. यामुळे शेतकरी पुर्णपणे आर्थिक संकटात सापडलेला आहे . त्याला शासकीय  मदती शिवाय आधार दिसत नाही.

सदर अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ शासनाकडून मदत मिळावी व जाहिर केलेला २५ % पिकविमा न देता १०० % पिकविमा जाहिर करुन सदर रक्कम शेतकन्यांना त्वरीत देण्यात यावी. या करीता आपल्या स्तरावरुन कार्यवाही करण्यात यावी. तात्काळ मदत जाहिर न झाल्यास दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांकरीता अमळनेर भारतीय जनता पार्टी रस्त्यावर उतरुन तिव्र स्वरुपात अंदोलन करेल. असा इशारा देखील भाजपाच्या वतीने देण्यात आला.

निवेदन देते वेळी माजी आमदार तथा प्रदेश उपाध्यक्ष स्मिता वाघ, हिरालाल पाटील, शाम अहिरे, व्ही.आर.पाटील, भैरवी वाघ-पलांडे, जिजाबराव पाटील, महेश पाटील, भरतसिंग पाटील आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.