नवी दिल्ली । देशात कोरोनाने शिरकाव केल्यांनतर देशातील राज्य आणि केंद्र सरकारनं सर्व शाळा, महाविद्यालयांसह शैक्षणिक संस्था बंद करण्याचा निर्णय घेतला. सध्या संपूर्ण देशभरात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउन करण्यात आला आहे.येत्या १४ एप्रिलला २१ दिवसांचा लॉकडाउन संपणार आहे. मात्र, करोनाच्या परिस्थितीचा आढावा घेऊनच शाळा महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय १४ एप्रिललाच घेण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांनी ‘पीटीआय’ला दिली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून सर्व शाळा, महाविद्यालयांसह अनेक परीक्षा सुद्धा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. दरम्यान आता बंद करण्यात आलेली शाळा, महाविद्यालय सुरु करण्याबाबत एक महत्वाचं वृत्त केंद्र सरकारकडून मिळत आहे.