मुंबई : भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणारे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्याबद्दल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बोलणं टाळलं आहे. ‘रात गयी बात गयी’ असं उत्तर चंद्रकांत पाटलांनी माध्यमांना दिलं, त्यामुळे आता भाजपनं खडसेंचा विषय सोडला का? अशी राजकीय चर्चा सुरू आहे.
चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आज पुण्यात अटल बस सेवेला हिरवा कंदील दाखवण्यात आला. त्यावेळी पत्रकारांनी त्यांना एकनाथ खडसे यांच्याबद्दल प्रश्न विचारला. मात्र, त्यांनी काहीही बोलणं टाळलं. खडसे हा विषय आता संपला आहे, असंच त्यांनी अप्रत्यक्षपणे सूचित केलं. खरंतर, खडसेंनी राष्ट्रवादी प्रवेश केल्यानंतर त्यांना कोणतं पद देण्यार यावर चंद्रकांत पाटलांनी घणाघाती टीका केली होती.