मुंबई :- पुलवामा येथे दहशतवाद्याने सीआरपीएफच्या ताफ्यावर केलेल्या हल्ल्यात भारताचे ४१ जवान शहीद झाले. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्विट करीत पाकिस्तानविरोधात युद्धाची भूमिका मांडली. हल्ल्याचा निषेध करणे, बदला घेणे ही मोठी गोष्ट नाही. पण जेव्हा पुढची येणारी पिढी विचारणार की पाकिस्तान कुठे होता, त्यावेळीच बदल्याचा खरा आनंद मिळतो, असे ट्विट त्यांनी केले आहे.
निंदा करना, बदला लेना कोई ज्यादा बड़ी बात नही है,
प्रतिशोध का मजा तब है जब आने वाली पीढियां हमसे पूछें
*'ये पाकिस्तान किधर था'।।*
*।। जय हिंद।।*
— Sanjay Raut (@rautsanjay61) February 18, 2019
या हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली असून पाकिस्तानविरोधात कठोर भूमिका घेण्याची मागणी जोर धरु लागली आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी सोमवारी ट्विट केले.