…अन् महाराष्ट्रातील ‘तो’ जवान हल्ल्यातून बचावला

0

अमहदनगर :- जम्मू-कश्मीरच्या पुलवामामध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) वाहनावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात ४० जवानांना वीरमरण आले. या हल्ल्यात महाराष्ट्रातील जवानांनाही वीरमरण आले. याच जवानांपैकी एकाचा जीव त्याचे दैव बलवत्तर म्हणून बचावला. ज्या बसमधील जवानांना हौतात्म्य आलं त्याच बसमध्ये हा जवान बसणार होता. पण, नशीबाच्या मनात मात्र काही वेगळे होते. सीआरपीएफमध्ये असणाऱ्या अहमदनगरच्या ठका बेलकर याचा या भीषण हल्ल्यातून जीव वाचला. पण, आपल्या साथीदारांना गमावल्याचं दु:ख त्यांना मरणयातनाच देत आहे.

ठका बेलकरने लग्नाकरिता केला होता सुट्टीचा अर्ज
ठका बेलकरने २४ फेब्रुवारीला लग्न असल्यामुळे काही दिवसांची सुट्टीची मागणी केली होती. परंतु गुरुवारपर्यंत त्याची सुट्टी मंजूर झाली नसल्याने त्याचही काश्मीरला जाणे अपेक्षित होते. आपली सहकाऱ्यांची तुकडी बसमध्ये चढत अतसातानच तोही त्यांच्यातच होता. पण, बसमध्ये चढण्यापूर्वी काही वेळाआधीच त्याची सुट्टी मंजूर झाल्याचा संदेश मिळाला. त्यामुळे काश्मीरच्या दिशेने आपल्या बटालियनसोबत न जाता त्याने आपल्या गावी येण्याची तयारी सुरू केली. सुखदु:खात साथ देणाऱ्या आपल्या जवान मित्रांसोबतची ती त्याची अखेरची भेट होती.

Leave A Reply

Your email address will not be published.