मुंबई : भाजपने मुंबई महापौरपदाची निवडणूक लढणार नाही अशी घोषणा केली आहे. आवश्यक संख्याबळ भाजपकडे नसल्याने निवडणूक न लढण्याचा निर्णय भाजपाने घेतला आहे. असं असलं तरी 2022 मध्ये मुंबईत भाजपचा महापौर असेल, असा दावाही भाजपाने केला आहे.
राज्यातील सत्तावाटपाच्या मुद्द्यावरून भाजप-शिवसेनेची युती तुटली आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेनं काँग्रेस-राष्ट्रवादीशी जुळवून घेतलं असून राज्यात सत्तास्थापनेची तयारी केली आहे. त्यामुळं संतापलेल्या शिवसेनेला एनडीएतून बाहेर काढल्याची अधिकृत घोषणाच भाजपनं केली आहे. या साऱ्या राजकारणाचे पडसाद मुंबई महापालिकेच्या राजकारणात उमटणार, असं मानलं जात होतं. मात्र, ही चर्चा फोल ठरली आहे.