अमळनेर;- धुळे जिल्ह्यातील अक्कलपाडा धरणातूंन पांझरा नदीत नुकतेच ३०० क्यूसेस आवर्तन सोडण्यात आल्यानंतर हे पाणी अमळनेर हद्दीत पोहोचले असून तालुक्यातील मांडळ येथे ग्रामस्थांनी आनंदात जलपूजन केले. या आवर्तनामुळे अमळनेर तालुक्यात पांझरा नदीकाठावरील अनेक गावाचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न तूर्तास सुटणार आहे.
आ . शिरीष चौधरींच्या विशेष प्रयत्नातून अक्कलपाडा धरणातून सुमारे 15 दिवसांपूर्वी पांझरा नदीत पिण्यासाठी पाणी सोडण्यात आले होते ते मुड़ी बोदर्डे गावा पर्यंत पोहचले आहे. पांझरा नदी धुळे तसेच जळगाव जिल्ह्यातून वाहत असल्याने धुळे अंमळनेर सिंदखेडा या तीन तालुक्यातील गावाना पिण्यासाठी तसेच शेती साठी फायदा होणार आहे. यामुळे पाणी पातळी वाढण्यात मदत होणार आहे .न्याहडोद, कवठल, वालखेडा, जापी, शिरडाने, कंचनपुर, मांडळ, वावडे, मुड़ी बोदर्डे, लोण बू, लोण खु, लोण चारम, भरवस, बाम्हणे, बेटावद , भिलालि, शाहापूर, तादळी आदि गावांना या पाण्याचा फायदा होणार आहे .हे आवर्तन सोडल्यास प्रशासनास भाग पाडल्याने आमदार शिरीष चौधरी यांचे परीसतील सरपंच उपसरपंच सदस्य व ग्रामस्थांनी विशेष आभार मानले आहेत.