पक्ष सोडून कुणी जाणार नाही, जे हौशे-गवशे आहेत तेच जातील

0

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम ठोकल्यानंतर जळगावमध्ये भाजपला गळती लागली आहे. एकनाथ खडसे यांच्या उपस्थितीत काल सोमवारी भाजपच्या 60 पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. खडसेंकडून सुरु असलेल्या या पक्षबांधनीबाबत भाजपचे माजी मंत्री आणि आमदार गिरीश महाजन यांना प्रश्न विचारला असता त्यांनी खडसेंना टोला लगावला.

“पक्ष सोडून कुणी जाणार नाही, जे हौशे-गवशे आहेत तेच जातील”, असा टोला गिरीश महाजन यांनी लगावला.  “राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकनाथ खडसे यांना काय मिळतं हा खडसे आणि राष्ट्रवादीचा प्रश्न आहे. एकनाथ खडसे यांनी आमचा पक्ष सोडला आहे आणि आम्ही त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. पक्ष सोडून कुणी जाणार नाही, जे हौशे गवशे आहेत तेच जातील”, असा टोला गिरीश महाजनांनी लगावला.

दरम्यान,  “आता मी भाजपला ताकद दाखवून देतो. उत्तर महाराष्ट्रात आता फक्त राष्ट्रवादी काँग्रेसच असेल”, अशी गर्जना एकनाथ खडसे यांनी केली आहे. “जळगावात भाजपचे अनेक कार्यकर्ते पक्षाच्या कार्यपद्धतीवर नाराज आहेत. हे कार्यकर्ते लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील”, अशी शक्यताही एकनाथ खडसे यांनी बोलून दाखविली.

Leave A Reply

Your email address will not be published.