धक्कादायक .. लग्न मंडपातून 36 लाखांचे दागिने लंपास

0

औरंगाबाद, लोकशाही न्यूज नेटवर्क 

औरंगाबाद येथून एक धक्कादायक घटना समोर आलीय. चक्क लग्न समारंभात पाहुणे म्हणून आलेल्या दोघांनी सोने-चांदीच्या दागिन्यांनी भरलेली बॅक लांबवल्याची घटना समोर आली आहे. या बॅगेत तब्बल 36 लाखांचे दागिने होते.

औरंगाबाद मधील सूर्या लॉन येथे आयोजित लग्न समारंभात ही घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ आता समोर आला आहे. औरंगाबाद येथे भर लग्नातून दागिने आणि रोख रक्कम असलेली बॅग चोरी गेली आहे. ही घटना गेल्या आठवड्यात घडली होती.

शहरातील सुर्या लॉन्स मध्ये लग्न सोहळा सुरू असतांना एक अल्पवयीन मुलाने ही बॅग लग्न गडबड सुरू असताना लांबवली. या बॅगेत जवळपास 36 लाख रुपयांचे दागदागिने आणि रोोख रक्कम होती. आठ दिवसांनंतर ही बॅग कशी चोरी गेली याचा सीसीटीव्ही पोलिसांच्या हाती लागला आहे.

या सीसीटीव्हीत दिसत आहे की, एक अल्पवयीन मुलगा लग्न समारंभातून बॅग घेऊन हॉल बाहेर पळत जात आहे. हॉल बाहेर आल्यानंतर तो एका कारमध्ये बसतो आणि त्याच गाडीत इतर इसमही मुलाच्या पाठोपाठ बसताना दिसत आहे. याचा अर्थ सरळ आहे लहान मुलांचा वापर अश्या चोरींमध्ये केला जात आहे. या प्रकरणी चिकलठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपी मात्र अजून हाती लागलेला नाही.

चिकलठाणा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस आरोीपंचा शोध घेत आहेत. आरोपी हे एका फोर व्हीलरमधून गेले होते. या फोर व्हीलरचाही पोलीस शोध घेत आहेत. दरम्यान लग्नसमारंभात इतक्या गर्दीतून लहानग्याने 36 लाखांचे दागदागिने असलेली बॅग पळवल्याने खळबळ उडाली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.